Monday, 7 September 2015

ऊस लागवड ऊस लागणिचि योग्य पद्धत


खालील बाबी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा.
नैसर्गिक रित्या प्रति एकारामध्ये पक्व ऊसाचि संख्या 35000 ते 45000 असते. "सरासरी 40000 असते" ! इथून पुढे हे सतत लक्षात ठेवले पाहिजे, " एकरी पक्व ऊसाचि संख्या 40000 असते" !
सुरुवातीला म्हणजे लागण झाले नंतर येणार्या फुटव्यांची संख्या अति जास्त असते. जास्त म्हणजे किमान दिड दोन लाखा पेक्षा जास्त ! आणि एवढे जास्त असलेली फुटव्यां पैकी शेवटी उरतात फक्त 40000 पक्व ऊस !! बाकीचे फ़ुटवे बरेच दिवस जगतात, जमिनीत टाकलेले अन्न ( खते ) खात असतात आणि 4 / 5 महिन्यानंतर ह्ळु ह्ळु 'गर्दी' मुळे मरुन जातात. ते आपोआप मरत असतात , त्या साठी आपल्याला काही करायचे नसते.
इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या - शेवट पर्यन्त नैसर्गिक रित्या जगणारे पक्व ऊस ( 40000 ) आणि गर्दी होऊन मराणारे ( एक ते दोन लाख ) हे दोन्ही फ़ुटवे जमिनीतील अन्न समान खात असतात आणि समान वाढत असतात. 4/5 महिन्यानी त्यातील कमकुवत असणारे फुटवे हळु ह्ळु गर्दी मुळे मरायला लागतात. हे जे मरणारे फ़ुटवे आहेत ते जेवढे दिवस जगतात तेवढे दिवस जमिनीतील अन्न खात असतात. आणि 4/5 महिन्यानी गर्दिमुळे हळु ह्ळु मरुन जातात. यात काळजी करण्यासारखे म्हणजे असे अन्न खाऊन मरणार्यान्ची संख्या 'शेवट पर्यन्त जगणार्या फ़ुट्व्यापेक्षा' (पक्व ऊस) खुपच जास्त असते. जवळ पास 3 ते 5 पट जास्त! त्या मुले जमिनीत आपण टाकलेल्या खता पैकी खुप जास्त खत (3 ते 5 पट) मरणारे फुटवे खातात , आणि मध्येच मरुन जातात. त्या मुळे जगणार्याना खुप कमी खत खायला मिळते. याचा परिणाम त्यांची जाडी, उंची चांगली येत नाही, ऊस चांगल्या प्रकारे वाढत नाही ऊस बारीक रहातो आणि शेवटी उत्पादन कमी मिलते.
लक्षात घ्या, ऊस हे खादाड पिक आहे. त्याला सुरुवाती पासून आणि पुढेही वेळच्या वेळी संतुलित ख़त खायला मिळावे लागते. आणि यासाठी त्यांना स्पर्धा करणारे फ़ुट्व्यान्ची संख्या मर्यादित असावी लागते. योग्य असावी लागते.
आपल्या लक्षात आले असेल की; पक्व उसाला स्पर्धा करणारे फुटवे जास्त नकोत. आणि असे फुटवे जेवढे जास्त तेवढा पक्व ऊस किंवा शेवट पर्यन्त जगणारे ऊस,स्पर्धा करणार्या फ़ुट्व्यान्नि खत जास्त खाल्या मुळे बारीक रहातात, आणि त्यामुळे अपेक्षित आव्हरेज/ टनेज मिळत नाही. आम्हा खुप शेतकरयाना असे वाटते की, "ऊसाचे फ़ुटवे जेवढे जास्त तेवढा ऊस फार चांगला आला" असे आपण म्हणतो. एवढेच नव्हे तर आपण एकमेकाला सांगतो की; ऊसाला जेवढे फुटवे जास्त तेवढा ऊस चांगला.
पण असे नाही, फुटवे योग्य प्रमाणात असायला हवेत. कमी नव्हेत!! "योग्य" पाहिजेत. योग्य म्हणजे किती हे समजले पाहिजे.
आपण पाहिले आहे की आहे की, "नैसर्गिक रित्या एक एकरात सरासरी 40000 ऊस जगतात". आणि फुटवे 60000 ते 70000 असावेत. म्हणजे त्यातील 20000 30000 फुटवे वेगवेगळ्या कारणानि मरतात. म्हणजे काही खोड कीड़ी मुळे मरतात, तर काही बाळ भरणी आणि मोठी भरणीच्या वेळी मारतात. अशा मराणार्यांची सख्या कमी असावी. म्हणजे खत फार वाया जाणार नाही.
एकंदरीत सुरुवातीला 60000 ते 70000 फुटवे घ्यावेत आणि त्यातील 40000 ते 45000 फुटवे जगुन ते पक्व ऊस होतील.

दोन महिन्याचे दरम्यान फुटव्यांची संख्या योग्य आले नंतर ऊसाचि "बाळ बांधणी" करावी. म्हणजे पुढे जादा फुटवे येणार नाहित आणि उत्पादनावर जादा फ़ुट्व्यान्मुळे वाईट परिणाम होणार नाही.
ऊसाचि "बाळ बांधणी" करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
बहुतेक आपण ऊसाचि "बाळ बांधणी" करत नाही. दुर्लक्ष करतो.
आता याच प्रमाणे गणित करावे.
सरिची रुंदी x सरिची लांबी = तेवढे जगणारे ऊस
सरिची रुंदी x सरिची लांबी = त्याचे सव्वा दीड पट फुटवे
*5 फ़ुट x 10 फ़ुट = 50 चौ फ़ुट, जगणारे 50 ऊस आणि फुटवे 60 ते 75
*6 फ़ुट x 10 फ़ुट = 60 चौ फ़ुट , जगणारे 60 ऊस आणि फुटवे 70 ते 90 फुटवे
*7 फ़ुट x 10 फ़ुट = 70 चौ फ़ुट, जगणारे 70 ऊस आणि 90 ते 110 फ़ुटवे
*4.5 फ़ुट x 10 फ़ुट = 45 चौ फ़ुट, जगणारे 45 ऊस आणि 60 ते 70 फुटवे
*4 फ़ुट x 10 फुटी = 40 चौ फ़ुट, जगणारे 40 ऊस व 55 ते 60 फुटवे
* 3.5 फ़ुट x 10 फ़ुट = 35 चौ फ़ुट, जगणारे 35 ऊस व 50 फुटवे
* 3 फ़ुट x 10 फ़ुट = 30 चौ फ़ुट, जगणारे 30 आणि फुटवे 45 असावेत

ऊस लागवड रासा खाताच्या योग्य मात्रा

एक टन ऊस पिकवण्यासाठी NPK किती लागतो याची माहिती अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्यानुसार अपेक्षित उत्पादन मिळवणेसाठि एकूण किती NPK लागेल त्या पैकी जमिनीत शिल्लक असलेला वजा जाता वरून किती द्यावा या साठी विद्यापिठाने 'अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र' दिले आहे, त्यानुसार खताच्या मात्रा ठरवाव्यात आणि 6 ते 7 वेळा विभागून योग्य मात्रेत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी द्याव्यात.

सुक्ष्म अन्न द्रव्ये देणे

सुक्ष्म अन्न द्रव्ये व् मँग सल्फेट ही दोन्ही खते NPK बरोबर न देता थोड्या शेणखतात 5 ते 7 दिवस मुरवत ठेवावेत आणि नंतर द्यावेत. बेसल डोस देण्या आगोदर 5 ते 7 दिवस मिसळुन ठेवावे, आणि लागनिचे वेळी द्यावे.
या मुळे सुक्ष्म अन्न द्रव्यान्ना सेंद्रिय चे कोटिंग होते ,त्या मुळे NPK बरोबर त्याचे प्रेसीपिटेशन होत नाही. दिलेल्या खाताची उपयुक्तता पूर्ण पणे मिळते.
किंवा बाजारात चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये मिळ्तात ती वापरावीत. ती थोडी महाग आहेत.
मोठी बांधनी किंवा भरणी चे वेळी देखिल असेच करावे.

एकरी मात्रा 100 टन ऊस उत्पादन
लागणिस मी देत असलेली मात्रा
1) सेंद्रिय ख़त 200 ते 500 किलो
डीएपी 100 किलो,
एमओंप़ी 100की,
सु अ द्रव्य 10किलो,
गंधक ग्रान्युअल 15 की,
माग सल्फेट 25 किलो.
सरीत टाकून मातीत मिसळुन घ्यावे.
2) 20 व्या दिवशी
यूरिया 50किलो सरित द्यावा.
3) 40 व्या दिवशी
यूरिया 100 किलो ,
लिम्बोळि पेंड 10किलो( जास्त नको)
मिसळुन सरित ध्यावे
4) 65 व्या दिवशी (बाळ भरणी)
यूरिया 50 किलो,
डीएपी 50 किलो,
एमओंप़ी 50 की
पहारिने छिद्रे घेऊन द्यावे.
6) भरणीचे वेळी
सेंद्रिय ख़त 200 ते 500 किलो ,
यूरिया 150 किलो,
डीएपी 100 किलो,
एमओंप़ी 75 की,
सु अ द्रव्य 10 किलो,
गंधक ग्रान्युअल 15 की,
माग सल्फेट 25 किलो.
7)मृग़ नक्षत्र निघाले नंतर द्यावे
24.24.0 100किलो
पोट्याश 25 किलो

ऊस लागवड पाण्याचे नियोजन

ऊसाचे मूळ परिसरात जेवढे पाणी उपलब्ध होइल तेवढेच फक्त वापरू शकते. मुलांच्या परिसरावरती अथवा खाली कितीही पाणी असले तरी त्याचा पिकाच्या दृष्टिने फारसा उपयोग होत नाही. दिलेले पाणी मुळाच्या परिसरात कसे राहील यावरच त्या पाण्याची उपयुक्तता अवलंबून असते. अथवा मूळांची वाढ भरपूर ती मुळे जमिनीच्या सर्व थरात कशी खालीवर खोल पसरतील हे पाहिले तरी पाण्याचा वापर योग्य त-हेने होण्यास मोठी मदत होते. भारी जमिनीचा पाण्याचा निचरा होण्याची क्षमता फारच कमी असते. त्यामुळे एकावेळी पाणी जास्त दिल्यास मुळांचे परिसरातील प्राणवायुचे प्रमाण घटल्याने मूळांची कार्यक्षमता एकदम कमी होऊन उभार वाढ खुंटते, नविन फुटवे येत नाहीत. आधी आलेले फुटवे मलूल होतात व् एकंदर पिकाचा जोरच कमी होतो. स-या तुडुम्ब भरुन पाणी वाहू लागेल अशा पद्धतीने पिकाला पाणी दिलेस वर उल्ल्हेख केलेले धोके प्रकर्षाने जाणवतात. माफक व मुरेल तेवढे पाणी एकावेळी पिकाला देणे नेहमीच फायदेशीर ठरते.
"थोड़े थोडे आणि सारखे सारखे पाणी द्यावे"

ऊस लागवड फवारणी व्यवस्थापण

उस पीकाला हवा,पाणी,सूर्यप्रकाश ,तापमान, खते इ.सर्व घटक अनुकूल अशा मिळाल्या तर शरीरात जैव रसायने तैयार होतात.त्यातलाच एक प्रकार म्हणजे संजिवाके .
वैशिष्टे
*अत्यंत सूक्ष्म प्रमाणात तयार होतात.
*पान,मुळे,खोड यांच्या कोवळ्या अंकुरात होतात.तेथून जीते कार्य असते तिथे वाहून नेली जातात.
*बीजाचा रुजावा,कोम्ब येणे, पालवी फुटणे, मुळे सुटणे, कांड्याची संख्या, लांबी,जाडी , साखर प्रमाण इ. बाबी संजिवकान्च्या विशिष्ट सन्तुलनामुळे घडते.
*संजिवाकाचे संतुलन चांगले असेलतर जमिनीत दिलेल्या खताचे, पाण्याचे शोषण होते, गाळ्पा योग्य उसाची संख्या वाढते.
*फ़ोटोसिन्थेसिस होऊन टनेज वाढते.
*** कांही महत्वाचे***
*संजिवके म्हणजे NPK सारखे पोषण द्रव्ये नव्हे.
* संजिवके म्हणजे सूक्ष्म द्रव्ये नव्हे.
* संजिवके म्हणजे कीटक नाशक किंवा जंतु नाशक नव्हे.
* संजिवके म्हणजे जीवाणु किंवा सेंद्रिय ख़त नव्हे.
#ऊसामध्ये खालिल संजिवके वापरता येतात.#
1.ऑक्झिन्स उदा IBA NAA
2.जिबरेलिन उदा GA4 GA7 GA3
3.सायटोकायनिन उदा 6BA
4.ट्रायकन्टेनाल
5.पोलारिस
6.ग्लायाफोसेट
अलीकडे सागर वनस्पतीचे अर्क उपलब्ध झालेले आहेत.आस्कोफायलम नोडुसम या वनस्पति पासून तैयार करतात.त्यामध्ये संजिवाके आणि पोषण द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
उसाचे पेराची लांबी, जाडी आणि संख्या वाढवण्याचे काम संजिवकाचे फवारणिने शक्य होते.

1) पहिली फवारणी
लागणी पासून 45 दिवसानी व खोडव्यासाठी तुट्ल्या पासून 30 दिवसानी आणि नंतर प्रत्येक 20 दिवसाचे अंतराने .
# पोषण द्रव्ये #
*18:18:18/19:19:19 - 600 ग्राम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 150 मिली
8 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* IBA किंवा NAA - 2 ग्राम
* SIX BA - 2 ग्राम
सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि वरील 8 लीटर पाण्यात मिसळावे.
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 120 मिली
* बाविस्टिन - 120 ग्राम
वरील 8 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण पम्पात घ्यावे, पम्प पाण्याने भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 4 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

2) दूसरी फवारणी
लागणी पासून 65 दिवसानी व खोडव्यासाठी 50 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*13:40:13/12:61:0/17:44:0- 900 ग्राम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 200 मिली
12 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* IBA किंवा GA - 3 ग्राम
* SIX BA - 3 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घ्यावे आणि वरील 12 लीटर पाण्यात मिसळावे.
# पीक संरक्षके #
* क्लोरोपायारिफोस - 180 मिली
* बाविस्टिन - 180 ग्राम
वरील 12 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 6 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे. याच दरम्यान खोड किड येत असते, काही बुरशी त्रास देत असतात, याचा विचार करुन ही फवारणी ठरवली आहे.

3) तीसरी फवारणी
लागणी पासून 85 दिवसानी व खोडव्यासाठी 70 दिवसानी
# पोषण द्रव्ये #
*13:40:13/12:61:0/17:44: 0 - 1500 ग्राम
* चिलेटेड सुक्ष्म अन्न द्रव्ये - 300 मिली
20 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* GA - 6 ग्राम
* SIX BA - 6 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे
# पीक संरक्षके #
* मोनोक्रोटोपास (आवश्यकतेनुसार) - 300 मिली
* हेक्झकोनेझाल (आवश्यकतेनुसार) - 300 ग्राम
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.
या फवारणित संजिवके आणि पोषण द्रव्ये सोबत बुरशी नाशक आणि कीटक नाशक आहे.

4) चौथी फवारणी
लागणी पासून 105 दिवसानी व खोडव्यासाठी 90 दिवसानी
ही फवारणी महत्वाची आहे, या नंतरची फवारणी ऊसाच्या ऊंची मुळे देता येणेची शक्यता कमी असते.
# पोषण द्रव्ये #
*13:40:13/12:61:0/17:44: 0 - 1500 ग्राम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 500 ग्राम
* काल्शियम नायट्रेट - 500 ग्राम
20 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* GA - 7 ग्राम
* SIX BA - 7 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
* ट्रायकाँन्टेनाँल - 500 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 500 मिली
वरील 20 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 10 पम्प पुरातात.

5) पाचवी फवारणी (शक्य झालेस)
लागणी पासून 125 दिवसानी व खोडव्यासाठी 105 दी
# पोषण द्रव्ये #
*12:61:0 - 1800 ग्राम
* पोट्याशियम माग्नेशियम सल्फेट - 600 ग्राम
26 लीटर पाण्यात मिसळावे .
# संजिवाके #
* GA - 10 ग्राम
* SIX BA - 10 ग्राम
अल्कोहोल व सालव्हन्ट मध्ये विरघळुन घावे आणि
वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
* ट्रायकाँन्टेनाँल (0.1%) - 1000 मिली
* सी विड एक्स्ट्राक्ट - 500 मिली
वरील 26 लीटर पाण्यात मिसळावे.
15 लिटरच्या पम्पात, वरील तयार केलेल्या मिश्रणा पैकी 2 लिटर मिश्रण घ्यावे व उरलेले पाणी भरुन फवारणी घ्यावी.
एकरी 13 पम्प पुरातात.

वरील प्रमाणे आणि शास्त्र समजुन जर प्रयत्न केले तर एकरी 100 टनच काय तर माझ्या इकडे "एकरी 151" टनाचा प्रयोगही निश्चित पणे यशस्वी होणार यात शंकाच नाही

उसावरील रोगांचे नियंत्रण

तांबेरा -
लक्षणे - कारणे -
- जादा साखर उतारा असणाऱ्या कोसी 671, को - 8014, को - 7219, को - 92005 या जाती रोगास बळी पडतात.
- पानाच्या खालच्या बाजूस लहान लांबट पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होऊन बुरशी बीजाणू वाढीमुळे फुगीर दिसते. त्यावर बोट फिरवल्यास बीजाणू पावडर बोटाला सहज चिकटते. रोगाची तीव्रता वाढून पाने करपून वाळतात.
उपाययोजना -
1) शिफारस नसलेले वाण वापरू नये.
2) शेतात पाण्यामुळे दलदल होऊ देऊ नये.
3) रुंद सरी वापरून अथवा पट्टा पद्धत वापरून लागण करावी.
4) रोग नियंत्रणासाठी कार्बेंडाझिम 1 ग्रॅम अथवा मॅंकोझेब 2.5 ग्रॅम किंवा प्रॉपीकोनॅझोल एक मिली किंवा कार्बेंडाझिम अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) एक ग्रॅम याबरोबर 1 मिली स्टिकर वापरून फवारणी घ्यावी. गरजेनुसार 10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून पुढील फवारणी सल्ला घेऊन करावी. उशिरा व अधिक प्रमाणात नत्र खते वापरू नयेत.

पोक्का बोइंग (वेणी रोग) -
लक्षणे व कारणे - उन्हाळ्यात वळीव पाऊस झाल्याने किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला बुरशीची लागण कोवळ्या पानावर होते. तिसऱ्या-चौथ्या पानाच्या बेचक्यात पांढरट पिवळे पट्टे पडतात. रोगट पाने आकसून लांबी घटते. पाने एकमेकांत गुरफटतात, कुजतात. कांड्या आखूड पडून वेडेवाकड्या वाढतात. तीव्रता वाढल्यास पोंगा मर दिसते.
उपायोजना -
1) खतमात्रा योग्य प्रमाणात योग्य वेळी द्यावी.
2) रोगट शेंडे काढून जाळून नष्ट करावेत.
3) कॉपर ऑक्सिक्लोराईड 2 ग्रॅम अथवा कार्बेंडाझिम 1 ग्रॅम किंवा मॅंकोझेब 3 ग्रॅम आणि 1 मिली स्टिकर प्रति लिटर पाणी वापरून 2 ते 3 फवारण्या कराव्यात.

अननस रोग (पाईनॅपल) -
लक्षणे व कारणे -
ऊस लोळल्यावर चिंबलेल्या, किडीने पोखरलेल्या किंवा उंदीर, खार, कोल्हा या प्राण्यांनी उभ्या उसास इजा केल्यास या रोगाची लागण होते.
- रोगट उसाच्या कांड्या सुरवातीस तांबूस लालसर पडतात. नंतर काळ्या पडून, कुजलेल्या कांड्याचा अननसासारखा वास येतो.
- भारी जमिनीत तसेच पूरग्रस्त, दलदल असलेल्या ठिकाणी रोगाची शक्यता जास्त असते.
उपाययोजना -
1) उसातील पाण्याचा निचरा करावा.
2) उसाची भरणी - बांधणी करताना ऊस लोळणार नाही, अशा प्रकारे मातीची भर द्यावी.
3) ऊस लागण करताना रासायनिक बेणे प्रक्रिया प्रति लिटर पाण्यात 1 ग्रॅम कार्बेंडाझिम व 1 मिली डायमेथोएट कीटकनाशक यामध्ये 10-15 मिनिटे बेणे बुडवावे.
4) कॉपर ऑक्सिक्लोराईड 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन मुळाजवळ आळवणी करावी.

पानावरील ठिपके -
लक्षणे व कारणे - अन्नद्रव्याचा ऱ्हास झाल्याने पिकाची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. सुरवातीस लहान डोळ्याच्या आकाराचे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके मोठे गोलाकार व रंगहीन होतात. पुढे रंगहीन भाग मधोमध लालसर तपकिरी व कडा करड्या होतात. तीव्रता वाढल्यास पाने करपून वाळतात.
उपाययोजना -
1) खतमात्रा योग्यवेळी योग्य प्रमाणात द्यावी.
2) रोग प्रादुर्भाव टाळण्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
3) नियंत्रणासाठी मॅंकोझेब 2 ग्रॅम अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम व स्टिकर 1 मिली प्रति लिटर पाणी घेऊन 2-3 फवारण्या 10 दिवसांच्या अंतराने कराव्यात.

गवताळ वाढ -
लक्षणे - रोग होण्याद्वारा वा किडीद्वारा पसरणाऱ्या फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म विषाणूमुळे होतो. ऊस बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे येतात. पाने अरुंद आखूड होतात व बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते. या रोगामुळे 20 टक्क्यांपर्यंत ऊस उत्पादनात घट येते.
उपाययोजना -
1) रोगमुक्त बेणे मळ्यातील बेणे वापरणे.
2) मूलभूत बेणे तयार करताना लागवडीपूर्वी बेण्यास उष्ण बाष्प हवा प्रक्रिया 54 अंश सें. तापमानास 150 मिनिटे करावी.

ब) उसावरील किडींचे व्यवस्थापन -

बुडखा कांडी कीड -
जमिनीत असलेल्या कांड्या पोखरलेल्या व तांबड्या रंगाच्या दिसतात. आत किडीची विष्ठा आढळते. अळी फिकट पिवळसर व नंतर दुधासारखी पांढरी दिसते. डोके पिवळसर लाल दिसते. अळी जमिनीतील उसाच्या कांड्या पोखरते.
उपाययोजना -
1) कीडग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये.
2) पाण्याचा निचरा करावा.
3) क्लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 2 मिलि प्रति लिटर मिसळून आळवणी करावी.
4) कीडग्रस्त शेतात ट्रायकोग्रामा हा अंड्यावरील परोपजीवी कीटक एकरी 1 लाख 20 हजार पंधरा दिवसांच्या अंतराने 4 ते 6 वेळा विभागून सोडावेत.

शेंडे अळी -
उसाच्या शेंड्याला खूप पाने आल्याने पानाचा झुपका दिसतो. शेंड्याला इजा झाल्याने उभ्या उसाचे कांडीवरील डोळे फुटतात. कांडीवर ओळीने आडवी छिद्रे दिसतात. पानांच्या पाठीमागे लाल वा केशरी रंगाची अंडीपुंज दिसतात. अळी मोत्यांच्या माळेप्रमाणे दुधी असते. अळ्या शेंड्याकडील कोवळ्या कांड्या पोखरतात.
उपाययोजना -
1) लालसर अंडीपूंज पानावरून गोळा करून नष्ट करावेत.
2) प्रकाश सापळे लावून प्रौढ पतंगाचा नायनाट करावा.
3) लहान प्रादुर्भावग्रस्त उसात प्रत्येक पोंग्यात 2 मिली क्लोरपायरीफॉस किंवा ट्रायझोफॉस 2 मिली प्रति लिटर फवारणी करावी.
4) मोठ्या उसात दाणेदार फोरेट (10 टक्के) अथवा फिप्रोनील दाणेदार एकरी 10 किलो वापरावे.

लोकरी मावा -
पानाच्या मागच्या बाजूस मध्य शिरेच्या दोन्ही बाजूंना दाटीवाटीने एकमेकांच्या अंगावर बाल्यावस्थेत पिले बसलेली दिसतात. कीडग्रस्त पानांवर पिवळसर ठिपके दिसतात. पहिल्या-दुसऱ्या अवस्थेत मावा पिलावर लोकर नसते. तिसऱ्या अवस्थेपासून लोकर येते. पानामधील रस शोषल्याने पाने निस्तेज होतात. मावा विष्ठा चिकट असल्याने त्यावर काळी बुरशी वाढते. पानांद्वारा प्रकाशसंश्लेषण थांबते.
उपाययोजना -
1) ऊस लागण पट्टा पद्धत वा रुंद सरी पद्धतीने करावी.
2) 6 ते 8 महिन्यांपर्यंतच्या उसास एकरी 5 किलो फोरेट किंवा फ्रिप्रोनील दाणेदार वापश्यावर मातीत मिसळावे.
3) क्रायसोपर्ला कार्नीया या परभक्षक कीटकाची 1000 अंडी अथवा अळ्या प्रति एकरी सोडावे.
4) कोनोबाथ्रा ऍफिडिव्होरा या परभक्षक कीटकाच्या अळ्या व कोष यांची प्रसारणे करावीत.

पिठ्या ढेकूण -
कांडीच्या पेराजवळ पानाआड राहून रस शोषण करतो.

पांढरी माशी -
पाने अर्धवट व काळ्या कोषांनी भरलेली आढळतात. लहान पिले पानाच्या खालील बाजूने रस शोषतात.
1) किडीच्या बंदोबस्तासाठी इमिडाक्लोप्रीड (200 एसएल) दीड मिली प्रति लिटर किंवा मिथोमिल 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 30 मिली यापैकी एक कीटकनाशक प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
2) व्हर्टिसिलीयम बुरशी 50 ग्रॅम + 1 कप दूध 10 लिटर पाण्यातून फवारावे.

उसावरील तणनाशक

खुप शेत-यांचा प्रश्न असतो की; " तननाशक वापरणे योग्य की अयोग्य?
त्यामुळे जिवाणू मरतात का? आणि वापरावयाचे असल्यास कोणते वापरावे? "
मी यातील तज्ञ नाही पण 1995 पासून आज पर्यन्त दर वर्षीच्या नविन ऊस लागणीत, आवश्यकतेनुसार तणनाशकाचा उपयोग करीत आलो आहे. त्या पासून मला योग्य फ़ायदा झाला आहे.
तणनाशकाचे दोन प्रकार आहेत.

1. तण उगवल्या नंतर वापरायचे
2. तण उगवणीपूर्वी वापरावयाचे

1 तण उगवल्या नंतर वापरायचे
जमिनीत पिक नसताना आणि तण भरपूर असेल तर "ग्लायफोसेट" घटक असणारे तणनाशक फवारावे. त्याचे प्रमाण त्यावर लिहिल्या प्रमाणे घ्यावे. हे तणनाशक हिरव्या पानावर फवारल्या नंतर पानातुन आत शोषले जाते आणि ते मुळ्या पर्यन्त पोहोचते. मुळ्याची तोंडे खराब होतात. त्यामुळे तणाला जमिनितुन काही शोषून घेता येत नाही आणि तण मरुन जाते. या तणनाशकाचे वैशिष्ट म्हणजे
~ हे तणनाशक मातीच्या संपर्कात आल्यास निष्क्रिय होते. त्या मुळे मातीवर फारसा वाईट परिणाम होत नाही.
ब-याच वेळा योग्य प्रमाणात तणनाशक फवारून आपणास अपेक्षित परिणाम दिसत नाही. मग आपण कंपनीस नावे ठेवतो.
असे तणनाशक फवाराताना पाणी फार स्वच्छ घ्यावे. पाण्यात थोडे जरी मातीचे कण असतील तर त्या मातीच्या कणाशी सम्पर्क होऊन तणनाशक निष्क्रिय होऊ शकते किंवा त्याची क्षमता कमी होते. त्या मुळे फ़वारणि साठी घ्यावयाचे पाणी स्वच्छ असावे. बर्याच वेळा पाटातिल पाणी, नदीचे पाणी फवारणी साठी घेतले जाते त्यात मातीचे प्रमाण असते, आणि त्या मुळे योग्य रिझल्ट मिळत नाहित. शक्यतो आदल्या दिवशी पाणी साठवलेले फवारणिस घ्यावे. यामध्ये अमोनियम सल्फेट किंवा यूरिया प्रति लिटर पाण्यास 3 ग्राम प्रमाणे मिसळावे.
काही वेळा ऊस दोन तीन महिन्याचा होतो , पाऊस आणि वेळेवर मजूर न मिळाल्या मुळे तण काढायचे राहून जाते. ऊस आणि तण बरोबरच वाढतात. अशा वेळी 2 4 D घटक फवारल्यास बरेचसे तण मरते. ऊसावर वाईट परिणाम होत नाही. यासाठी बाजारात बरीचशी तणनाशक उपलब्ध आहेत. दुकानदाराशी आणि कंपनीच्या प्रतिनिधिशी चर्चा करुन योग्य तणनाशक निवडावे.
ऊसाच्या पानावर न पड़ता फक्त तणावर, हुड लावून ग्लायफोसेट फवारले तर उसास काहीही वाईट परिणाम न होता तण मरेल.
# लक्ष्यात असू दया.
# ऊस तुटुन गेल्यानंतर फड पेटवला असता त्याच्या उष्णतेने जमिनीतील 1 ते 2 इंचातील जीवाणु मरतात.
# तणनाशकामुळे असे नुकसान होत नाही. अगदी वरच्या थरातील जीवाणु काही प्रमाणात मरतात.
# "अति तेथे माती " हे ही लक्ष्यात असू दया. सारखे सारखे तणनाशक फवारु नये. त्या मुळे जमीनीवर वाईट परिणाम होत असतो.
# शिफारशी प्रमाणेच फवारावे.
# ग्लायफ़ोसेट हिरव्या पानावर पडले की ते पिक मरते.

माझेकड़े ऊस पिकास लावणी नंतर एकदा तण नाशकाची फ़वारणी होते. ऊस तुटल्यानंतर पाचटचे आच्छादन असल्याने तण उगवत नाही. वरम्ब्यावर थोडेफार येते, तेवढे काढणे फार अवघड नसते. खोडवा आणि निडवा या वेळी पाचट आच्छादनामुळे तणनाशक वापरावे लागत नाही. म्हणजे लागन आणि दोन खोड़वे असे तिन चार वर्षात एकदाच तणनाशक मी वापरतो

2. तण उगवणीपूर्वी वापरावयाचे

मेत्रीबुझीन (सेंकोर ) ओल असतानाच फवारावे हे मुळाद्वारे व काही प्रमाणात पानाद्वारे शोषले जातात.मेत्रीबुझीन हे २.२ किलो प्रती हेक्टर च्या वर फवारू नये .हि फवारणी झाली असता ९-१० दिवसांनी पाणी दिल्यास चांगला परिणाम मिळतो .24D हे फवारले असता शेजारील ४-५ एकरात कपाशी वर वाईट परिणाम दिसतो .


ऊस लागण झाल्यानंतर 3 ते 4 दिवसात जमिनीत ओल असताना मेट्रीब्युझिन 41% तण नाशक व्यवस्थित फवारावे. योग्य फ़वारणि झाल्यास सुमारे 2 महीने तण उगवत नाही. फक्त द्विदल तण उगवत नाही. ऊस उगवणिवर वाईट परिणाम होत नाही.
काही वेळा तण रानात उगवलेले असताना लागण करावी लागते. अशा वेळी मेट्रीब्युझिन 41% बरोबर 24D मिसळुन फवारणी केल्यास उगवलेले तण मरेल व दोन महीने नविन तण उगवणार नाही. ऊस उगवणिवर वाईट परिणाम होत नाही.
काही शेतकरी लागन झाले नंतर 15 दिवसानी जमिनीत ओल असताना मेट्रीब्युझिन 41% आणि 2 4D फवारतात, त्या मुळे तिथून पुढे 2 महीने तण उगवत नाही. म्हणजे अडीच महीने तण मुक्त रान असेल.

ऊस लागवड जमिनीची सुपीकता

ऊसाचे उच्चांकी उत्पादन घ्यायचे हा निर्धार आता अनेक शेताकर्यान्नी केला आहे. शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन ,अनुभवी शेतकर्यांच्या सूचना,बाजारात उपलब्ध असलेली खते, किटक नाशके ,तण नाशके, जिवाणु खते, संजिवाके यांची माहिती यांचा मेळ घातला तर ध्येय नक्की गाठता येईल. यासाठी आरंभापासुन ऊसशेतिच्या अनेक विविध घटकांचे काटेकोर नियोजन ही सर्वाधिक महत्वाची बाब आहे.
उन्हाळी नांगरट होऊन ढेकळे न फोड़ता जमीन में महिन्याच्या पहिल्या पंधरवडया पर्यन्त चांगली तापलेली असावी, वैशाख जेष्ठाची प्रखर उन्हें जमिनीत आरपार भेदुन गेलेली असावीत. त्यामुळे पूर्वी घातलेल्या खतापैकी जमिनीत बंदिस्त झालेली अन्नद्रव्ये मुक्त झालेली असावीत. में महिन्यात कधीतरी बरसनारयां वळ्वाने, तापलेल्या जमिनितिला आक्टीनो मायासेट चेतविले जावेत. पावसाच्या शिड्काव्याने सुक्ष्म जीवांनी उत्सर्जित केलेल्या द्रवाने आसमंत सुगन्धित व्हावा.
आशा या तापलेल्या जमिनीवर कम्पोस्ट, शेणखत, लेंडीखत, गाण्डुळ ख़त, कोम्बडि ख़त, पेंडी ख़त असे मिसळुन एकरी चार पाच टन सेंद्रिय पसरलेले असावे. रोटरने ते एकजीव झाल्यावर में महिन्याच्या अखेरीस ताग धैच्या पेरालेला असावा. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तो फुलावर यतो.जमिनीत गाडून त्यावर एकरी एक पोते यूरिया व् एक पोते सिंगल सुपर फोस्फेट ट़ाकुन हिरवलिच्या खताशी एकरूप करावा.
अशी तापलेली, बेवड झालेली, सेंद्रिय घटकांनि समृद्ध झालेली जमिन म्हणजे उच्चांकी उत्पादनाचे ध्येय गाठन्याची पहिली पायरी आहे.

जमीन सुपिक असल्या शिवाय कोणतेही पिक उत्तम येणार नाही. योग्य मशागत, योग्य प्रमाणात सेंद्रिय खते आणि जिवाणू यांचा योग्य वापर या मुळे जमीन सुपिक होते. सेंद्रिय ख़त म्हणजे शेणखत, कम्पोस्ट ख़त, गाण्डुळ ख़त, लेंडी ख़त, अखाध्य पेंड़ी , हिरवळिचे खत वगैरे होय. यांच्या वापरामुळे जमिनीची जडण घडण सुधारते, कणाची रचना सुधारते, ह्यूमसचे प्रमाण वाढून अन्न द्रव्ये व् उपयुक्त पाण्याची धारण शक्ति वाढते. सामू योग्य होतो, क्षारता सुधारते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे 'सेंद्रिय कर्ब' वाढतो. सेंद्रिय कर्ब हे जिवाणुचे खाद्य आहे. त्याच्या मुळे जिवाणुनची संख्या आणि कार्यक्षमता योग्य रहाते. जमिनीत पुरवलेले अन्न घटक / खते पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य जमिनीतील विविध जीवाणु करीत असतात. जीवाणु योग्य प्रमाणात आणि कार्यक्षम असले की दिलेली खते पिकास भरपूर उपलब्ध होतात , त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते. अशा अनेक बाबी सेंद्रिय खतामुळे सुधारतात आणि जमीन सुपिक रहाते.
जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा अनेक प्रकारच्या स्वरूपात दिसून येतो.जमिनीत सूक्ष जीवाणु त्यांचे विघटन करीत असतात.या विघट्नातुन जे नवीन सेंद्रिय पदार्थ तयार होतात ते बऱ्याच प्रमाणात स्थिर स्वरुपाचे असतात.वैद्न्यानिक अर्थाने आपण त्यांना ह्युमस असे नाव् देतो.हयुमसयुक्त सेंद्रिय पदार्थ चार घट्कांमध्ये विखुरलेला असतो. त्याला ह्युमिक आसिड,फुलविक आसीड,ह्युमिन व् हेमाटोमेलानिन या नावाने संबोधले जाते.यांचे प्रमाण वेगावेगले असते त्यामुले जमिनीच्या गुणधर्मावर व अन्न्द्रव्य शोषणावर वेगावेगले परिणाम दिसून येतात.
ह्युमसमुळे भौतीक रासायनिक व जैविक
गुणधर्मात क्रांतिकारी बदल होतात.या बदलामुले जमिनिनिची सुपिकता पातली तर वाढ़तेच पण त्या बरोबरच तिची उत्पादन क्षमताही वाढते.
महाराष्ट्रातिल हवामान तसे उष्ण असलेणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी सतत कमी होंत असते आणि ती 0.6 च्या आसपास स्थिरवते.ही पातळी 0.8 च्या वर असावी. पण तसे पातळी गाठणे खुप जिकिरिचे असते.
सेंद्रिय कर्बाची पातळी योग्य ठेवाणेसाठी सेंद्रिय खते मुबलक पुरवावित.
शेणखत,कम्पोष्ट ख़त, गान्डुल ख़त, अखाध्य पेंडीचे मिश्रण, लेंडी ख़त, पोल्ट्री ख़त इत्यादि आणि या शिवाय अति महत्वाचे म्हणजे हिरवळिचे ख़त होय. आणखिणहि आपापल्या परिसरात उपलब्ध असणारे सेंद्रिय खते जमिनिस योग्य प्रमाणात पुरवावित.
महत्वाचे- सेंद्रिय कर्बामुळे जिवनुंचि संख्या आणि कार्यक्षमता सुधारते आणि अन्न घटकाचे उपलब्धिकरन मोठ्या प्रमाणात होते.

खोडव्यास नांगरट, कलटिव्हेटर, रोटर, सरी वगैरे मशागतिचि आवश्यकता नसते म्हणजेच तो खर्च नसतो. बियाणे , लागनीचा खर्च वगैरे बाबींचा खर्च नसतो. हे अत्यंत महत्वाचे आहे. याच्या शिवाय अजुन अत्यंत महत्वाचे आणि उत्पादन जास्त मिळण्याची बाब म्हणजे; उस ज्या क्षणी तुटतो त्या क्षणपासून खोडव्याची वाढ सुरु झालेली असते. लागण केले नंतर 15 ते 25 दिवस उसाची उगवण होण्यास लागतात आणि नंतर हळू हळू जश्या मुळ्या तयार होतील तशी त्याची सुरुवातीला हळू हळू वाढ होते आणि नंतर जोमाने वाढ होते. खोडव्या मध्ये मात्र वाढ लगेच होते कारण त्याच्या मुळ्या आगोदरच तयार असतात. त्याला योग्य खत पाणी मिळाले की जोमाने वाढ सुरु होते.
ऊस तुटल्या नंतर पाचट न जाळता सरी मध्ये दाबून घ्यावे किंवा पाचट जास्त असल्यास कुट्टी मशीनने टुकड़े करुन सरित दाबून घ्यावे. पाचट व्यवस्थित कम्पोस्ट होण्यासाठी त्याचेवर 50 किलो यूरिया 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. शक्य झालेस 4 ते 5 किलो कम्पोष्ट जीवाणु पसरावेत.